Breaking News

शेतक-यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय

 आरोग्य सेवेला बळकटी, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या 

माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्पः नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा, कृषी व पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन महाराष्ट्राला पुन्हा विकासपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. अर्थसंकल्पाचे स्वागत करून पटोले म्हणाले की, कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झालेली असतानाही महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने आरोग्य, कृषी, शिक्षण, सिंचन, महिला, तरूण, विद्यार्थी, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक ग्रामीण व शहरी पायाभूत सुविधांसह विकास प्रकल्पासांठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. यामुळे मागच्या सरकारच्या काळात ठप्प झालेली विकासाची प्रक्रिया सुरु होणार असून महाराष्ट्राची विकासपथावर वेगाने घोडदौड सुरु होईल.  

         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालये, नगर पंचायती आणि नगरपरिषदांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ७ हजार ५०० कोटी रूपये जाहीर केले आहेत. सिंधुदुर्ग, रायगड, उस्मानाबाद, सातारा, नाशिक, अमरावती, परभणी येथे नविन वैद्यकीय माहविद्यालये उभारण्यात येणार आहेत.
कोरोना काळात राज्याच्या अर्थव्यवस्थेला हाथ देणा-या बाळीराजाला साथ देण्यासाठी तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीसाठी २ हजार कोटी,  पशुसंवर्धन आणि मत्स्य योजनेसाठी ३७०० कोटी, विकेल ते पिकेल या योजनेसाठी २ हजार १०० कोटी, कृषीपंपाच्या जोडणीसाठी १५०० कोटी तर सिंचनासाठी जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना १२ हजार ९१९ कोटी, जलंसधारण प्रकल्पांसाठी २ हजार ६० कोटींची तरतूद केली असून गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  
         ग्रामीण भागाच्या विकासासाठी ७ हजार ५०० कोटी, पुणे रिंगरोड, मुंबई गोवा किनारी मार्ग, पुणे नगर नाशिक रेल्वे मार्ग, ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पासह मुंबईतील विकास प्रकल्पांसाठीही भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे.  राज्यातील, रस्ते, तिर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. यासोबतच महाज्योती, सारथी, बार्टी या संस्थांसाठीही प्रत्येकी दीडशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे.   
   विद्यार्थीनी, गृहिणी, कष्टकरी महिलांसाठी राज्य सरकारनं नव्या योजना जाहीर केल्या आहेत. घराची नोंदणी महिलांच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी मोफत एसटी प्रवास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शहरातील महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणखी तेजस्विनी महिला बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. राज्य राखीव पोलीस दलात राज्यातील पहिलीच स्वतंत्र महिला पोलीसांची तुकडी स्थापन करण्यात येणार आहे.
       पुणे येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, प्रत्येक महसुली मुख्यालयाच्या जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक “राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क”, राज्यातील युवकांसाठी कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना सुरू करण्यता येणार असून शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या 75 टक्के किंवा 5 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. योजनेच्या माध्यमातून युवक-युवतींना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. या अर्थसंकल्पातील तरतुदींच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून राज्याच्या प्रगतीचा वेगही वाढणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

  सामाजिक न्यायाची उपेक्षा करणारा अर्थसंकल्प 
महाविकास आघाडी सरकार ने महाराष्ट्र राज्याचा आज सादर केलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राच्या विकासाला खीळ घालणारा; राज्याच्या विकासाची गती मंदावणारा ; गरिबांचा अपेक्षाभंग करणारा;  दलित मागासवर्गीयांसाठीच्या   सामाजिक न्याया ची उपेक्षा करणारा अर्थसंकल्प आहे. 
 केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


सभी को न्याय देने वाला बजट

महाराष्ट्र को सक्षम और न्याय देने वाला बजट है। विरोधी सिर्फ राजकारण कर रहे है। केंद्र से 32000 करोड़ GST लेना बाकी है।  केंद्र महाराष्ट्र सरकार को बदनाम करने के लिए जानबूझकर निधि रोक रही है। अमरावती परभनी में शासकीय मेडिकल कॉलेज खुलेंगे। बिजली के बाकी बिलों में 33 प्रतिशत छूट। गोसीखुर्द के लिए 1000 करोड़। किसानों को 3 लाख पीक कर्ज पर  0 प्रतिशत ब्याज पर । ग्रामीण विद्यार्थियों को मुफ़्त बस सेवा।विदर्भ को बजट की 23 प्रतिशत राशि दी गई है
 
वेदप्रकाश आर्य, उपाध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी


महिलांप्रति कृतज्ञता  व्यक्त करणारा अर्थसंकल्प 

महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अर्थमंत्र्यांनी  आंतर राष्ट्रीय महिला दिनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी समाविष्ट केलेल्या काही योजनांच्या माध्यमातून महिलांप्रती  कृतज्ञता  व्यक्त करणारा अर्थसंकल्पात सादर केल्याचे  दिसून येते परंतु त्याच महिलांना महागाईपासून दिलासा मिळणार असल्याने अर्थसंकल्पात  दिसत नाही. शेतकरी, आरोग्य, रस्ते , वाहतूक, विद्यार्थी कौशल्य विकास, शालेय शिक्षण,  उच्च व तंत्रशिक्षण इत्यादि विभागासाठी चांगला  तरतुदी असल्या तरी सदर योजना प्रमाणिकपणे राबविल्याशिवाय सामान्य नागरिकांना त्याचा लाभ मिळणार नाही. कोरोना सारख्या महामारीच्या संकटात सादर केलेला अर्थसंकल्प दिलासा देणारा आहे. 
जोतीराव बारसागडे, संचालक 
न्यू चैतन्य स्कुल व सेंट रॉबेन पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज जरीपटका नागपूर   


 Budget to strengthen healthcare, boost employment through agriculture and infrastructure projects: Nana Patole 

 Historic decision to give interest free crop loan up to Rs 3 lakh to farmers 

 Budget to get Maharashtra back on track 

Mumbai: Maharashtra Pradesh Congress Committee (MPDC) Chairman Nana Patole has said that the second budget of the Maharashtra Vikas Aghadi government is to strengthen health services in the state in the wake of Corona epidemic, boost employment through agriculture and infrastructure projects and take Maharashtra back on the path of development. Patole said that despite the sharp decline in the state's revenue in the wake of the unprecedented crisis in Corona, the Maharashtra Vikas Aghadi government has allocated substantial funds for development projects including health, agriculture, education, irrigation, women, youth, students, dalits, tribals, minority rural and urban infrastructure. This will start the process of development which was stalled during the previous government and will accelerate the pace of development of Maharashtra.
           Against the backdrop of Corona, Rs 7,500 crore has been announced for providing health facilities in district hospitals, Nagar Panchayats and Municipal Councils. New medical colleges will be set up at Sindhudurg, Raigad, Osmanabad, Satara, Nashik, Amravati, Parbhani. Crop loans of up to Rs 3 lakh will be provided at zero percent interest rate to support Baliraja who helped the state's economy during the Corona period. 2,000 crore for strengthening of Agricultural Produce Market Committees, Rs. 3,700 crore for Animal Husbandry and Fisheries Scheme, Rs. 2,100 crore for Vikel to Pickel Scheme, Rs. 1,500 crore for connection of agricultural pumps, Rs. A provision of Rs 1,000 crore has been made for the project. 7,500 crore for the development of rural areas, Pune Ring Road, Mumbai-Goa Coastal Road, Pune Nagar Nashik Railway Road, Thane Circular Metro Project and development projects in Mumbai. The state has been heavily funded for the development of roads, pilgrimage sites and tourist destinations. Apart from this, a provision of Rs 150 crore has been made for Mahajyoti, Sarathi and Barti. 
      The state government has announced new schemes for students, housewives and hardworking women. If the house is registered in the name of a woman, stamp duty will be reduced. Girls in rural areas of the state will be provided free ST travel to go to school. More bright women buses will be made available for the safe travel of women in the city. 
              The first independent women's police force in the state will be set up in the state reserve police force. The Maharashtra Apprentice Candidate Incentive Scheme will be launched and the apprentice candidates will be paid 75 per cent of the tuition fee or Rs. 5,000. The scheme will provide huge employment opportunities to the youth. The Congress state president said that the provisions in this budget would boost employment generation and accelerate the progress of the state.

No comments