Breaking News

बाबासाहेबांची युथ रिपब्लिकन मुव्हमेंट





डॉ. आंबेडकरांनी   दलितांना माणुसकीचे खरे  हक्क  मिळवून  दिले. बाबासाहेब  भूतकाळाचे सूक्ष्म आकलन  व भविष्याच्या निश्चित वेध घेणारे होते अर्थात सामाजिक जीवनात त्यांनी मूलभूत क्रान्ति करून  देशाच्या प्रगतीत भर टाकण्याचे महत्वपूर्ण  कार्य केले. फेसबुक, व्हाटसअप , ट्विटर, युट्युब  अश्या सोशल मीडिया व समाजातील सामाजिक संघटना यांच्यामाध्यमातून तरुण पिढी बाबासाहेबांची युथ रिपब्लिकन मुव्हमेंट एका पिढीकडून दुसऱ्यापिढी पर्यंत जनजागृतीचे कार्य करीत आहे.  

डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांनी धर्मातराच्या  माध्यमातून रेखाटलेले ते नवजीवनाचे  स्वप्न  जीवनाच्या मूलभूत जाणिवेत बदल करण्याचा  संकल्प ..त्यासाठी धम्मप्रवेश .लक्षावधी  अनुयानांना बुद्ध धम्माची दीक्षा ही भारतीय जनतेचा सांस्कृतिक  कायापालट करणारीती  क्रांती  क्रांतिकारानी वंदावे अशी हि घटना  चौदा ऑक्टोबर१९५६ रोजी रक्ताचा एक थेंबही न सांडता झाली.   डॉ बाबासाहेब आंबेडकरांच स्वप्न होते  कि , माझा रिपब्लिकन पक्ष हासत्ताधारी नसला तरीत्याने भारतातल्या विरोधी पक्षाची तरी भूमिकाबजवावी. त्यासाठी त्यांनी राममनोहोर  लोहिया,प्रबोधनकर ठाकरे आणि केशव प्रल्हाद अत्रे ह्यांच्याशी पत्रवेव्हार  देखील  केला होता. परंतु थोड्याच दिवसात पक्षस्थापने अगोदरच  बाबासाहेबांनी जगाचा निरोप  घेतला आणि  रिपाई  हि  फक्त संकल्पनाच राहिली. बाबासाहेबांनंतर रिपाईमध्ये जो वाद निर्माण झाला तो अजूनही  अबाधित आहे.                

        
हि पोकळी पँथरच्या काळात एकीकरणाचाधागा बनली, रिपाईची धुरा सांबाळत असणाऱ्यापिढीने तिची जबाबदारी दुसऱ्यापिढीकडे सोपवली.त्याच दुसऱ्या पिढीचे उमेदवार  म्हणजे रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, अविनाश महातेकर, ज. वि. पवार, भाईसंगारे, अरुण कांबळे, राजा ढाले, नामदेव ढसाळ आणिप्रकाश आंबेडकर हे होते. बाबासाहेबांच्या "रिडल" पुस्तकाचा शिवसेनेने चुकीचा संदर्भ लाऊन पुस्तके जाळण्याचा आग्रह धरला. त्यावेळी न भूतो न भविष्यात असालाखोंचा जनसमुदाय हा रस्त्यावरती उतरून रिपाईच्या ऐक्यासाठी झुंजला होता, त्यावेळी ऐक्य होऊन आपले ४ खासदार लोकसभेमध्ये निवडून आले होते. 
        आंबेडकरी अनुयायांच्या सामाजिक एकोप्याचे दर्शनबराच काळ दुरापास्त झाले होते. त्यामुळे अनेक प्रश्नांवरसरकारला घाबरवून सोडणारी ‘रिपब्लिकन’ चळवळथंडावली का, असा प्रश्न उपस्थित होत होता. अशा वेळी सहा डिसेंबर २०११ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकऱ्यांचे  मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भीमसैनिकांनी इंदू मिलचा ताबा घेतला.त्यामुळे मरगळलेल्या रिपब्लिकन चळवळीला नवी उभारी मिळाली आहे.
     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने घरातच समाजकार्याचा वारसा असलेल्या आनंदराज यांनी १९९८ मध्ये ‘तरुण मनाची बहुजनांच्या न्याय्यहक्कांसाठी लढणारी’, रिपब्लिकन सेना स्थापन केली.बहुजन समाजातील छोटे-मोठे सामाजिक प्रश्न हाताळण्याचे काम त्यांच्या  संघटनेकडून सुरू होते. ‘एनटीसी’च्या ताब्यात असलेल्या इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यासाठी १९९२ पासून जवळपास २० वर्षे विविधस्वरूपाची आंदोलने सुरू होती. या आंदोलनाकडे त्यांनी अचानक संपूर्ण लक्ष केंद्रित केले. केवळ एवढय़ावर नथांबता सहा डिसेंबर २०११ रोजी शेकडो भिमसैनिकांच्या उपस्थितीत इंदू मिलवर धडक दिली.‘इंदू मिलची संपूर्ण साडेबारा एकर जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळवणारच, अशी जिद्द बाळगलेल्या आनंदराज यांच्या नेतृत्वाखाली भिमानुयायांनी इंदूमिलमध्ये जवळपास महिनाभर तळ ठोकला होता. पण, हे करत असताना अगदी सहा डिसेंबर २०१२ पर्यंत जवळपास वर्षभराच्या काळात या आंदोलनाला हिंसकवळण लागणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली होती.यामुळेच कोणताही यशस्वी लढा देण्यासाठी अखेपर्यंतनिकराची झुंज व सातत्य गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी इंदू मिलची जागा  स्मारकासाठी मिळाल्यानंतर दिली. विशेष म्हणजे हा संपूर्ण आंबेडकरी जनतेचा विजय आहे, असे सांगून श्रेयासाठी धडपडणा-या नेत्यांच्या रांगेतून ते अलिप्त राहिलेत. आगामी काळात आंबेडकरी चळवळीतील तरुण आणि 
मरगळलेल्या नेतृत्वाला त्यांच्याकडूनच उभारी मिळेल, अशी अपेक्षावाढली आहे.
  देशामध्ये खऱ्या अर्थाने कुठेही रिपब्लिकन तत्वज्ञानाची सत्ता नसताना अमेरिकेच्या ‘स्टॅच्यू ऑफलिबर्टी’प्रमाणे दादरच्या इंदू मिलच्या साडेबारा एकरजागेवर बाबासाहेबांचं,‘स्टॅच्यु ऑफ इक्वॉलिटी’म्हणून आंतरराष्ट्रीय स्मारक उभं करायचं स्वप्न आहे. कोणीम्हणेल, हा प्रश्न भावनिक आहे. परंतु हा प्रश्न न्यायाचा,अस्तित्वाचा आणि अस्मितेचा आहे. कोणाकोणाचीस्मारके झाली, आणि या   देशाच्या संविधानकाराचंस्मारक बनवायला मात्र हा देश विसरून गेला. ज्या महामानवाने या देशात कायद्याचं राज्य आणलं, त्याचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारायला भाग पाडण्याचं हे आव्हान  रिपब्लिकन चळवळीने स्वीकारलं तर ती पुन्हाएकदा जिवंत झाल्याशिवाय राहणार नाही. परिवर्तनाच्या चळवळीवर अभ्यास करणाऱ्या जगातील अभ्यासकांनाव विद्वानांना या  स्मरकाचा संदर्भासाठी उपयोग होणारआहे. इतकेच नव्हे तर आपल्यानंतरच्या आपल्या १७००पिढ्यांना आपण कोण आहोत, आपला सांस्कृतिकवारसा काय आहे, आपल्याला भविष्यात नेमकं कायकरायला हवं याचं स्पष्टपणे दिशादिग्दर्शन हे आंतरराष्ट्रीय स्मारक करीत राहील.  
  आंबेडकरांची युथ रिपब्लिकन मुव्हेमेंट  बळकट करण्यासाठी २०१४ ला उत्तर नागपुरात"लिबर्टी क्लासेसची" निशुल्क स्पर्धा परीक्षेची  सुरुवात झाली. पाच  तरुणांनी कुठलीहीशासकीय मदत न घेता लोकसहकार्यातून ३४० विद्यार्थ्यांना  स्पर्धापरीक्षेच्या माध्यमातून भवित्व घडिवले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा जोतिबा फुले ,संत कबीर  या महापुरुषांच्या विचारातून प्रेरना घेत  समाजातील ऋणपरतफेड   या उद्देशाने मागासवर्गीय  गोर गरिबांच्या होतकरू  मुलामुलींसाठी  रोशन जांभुळकर, प्रशांत बेले, पारितोषसरदारे , श्रीकांत हिरेखान, प्रवीण वानखेडे या तरुणांचासंकल्पनेतून "लिबर्टी क्लासेसची" निशुल्क स्पर्धापरीक्षेची  सुरुवात झाली.   जपानी भाषा हि आशियाई भाषांपैकी एकमहत्वाची भाषा आहे . जपान हा एक विकसित देश  असल्यामुळे  आणि भारत सरकार व जपानी सरकारयांच्यात काही करार  झाल्यामुळे अनेक  जपानीकंपन्या  भारतात मोठ्या  प्रमाणावर गुंतवणूक  करत आहेत. फुजीतसु,होंडा या काही   नावाजलेल्या  कंपन्याआपल्याला माहीतच  आहेतच . जपान व्यवस्थापन असणाऱ्या सर्वकंपन्यांमध्ये जपानी भाषा जणणारे कर्मचारी  हवेच असतात, त्याव्यतिरिक्त इन्फोसिस,टीसीएस अश्या   भारतीय कंपन्यादेखील जपानी बोलूशकणाऱ्या इंजिनीयर्सना प्राधान्य  देतात २०१७मध्ये  जपानी भाषेचा निशुल्क अभ्यासक्रम  सुरु केला. १२ तरुण-तरुणीची निवड जापांमध्ये झाली.जेएलपीटी (Japnese Language Prefesiancy  test)या परीक्षा  जपानीभाषेच्या अभ्यासानंतर JLPT  (Japnese Language Prefesiancy  test)  वर्षेतून  जुलै वदिसेंबर मध्ये परीक्षा होते. परीक्षा शुल्क  एक ते दीडहजार असते. एन ५ पासून एन १ पर्यंतच्या परीक्षा देतायेते. चांगल्या  नोकरीची संधी असेल तर एन ३प्रमाणपत्र  असणे आवश्यक आहे.  या  जपानी भाषेचाकोर्स पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन वर्षे लागतात लिबर्टीक्लासेस मध्ये निशुल्क शिकवले जातात.
   
   आतापर्यंत विदर्भातील बऱ्याच विद्यार्थंनी लॅबर्टीसंस्थेमार्फत  जपान मध्ये नोकरी मिळविलेली आहे लिबर्टी क्लासेस विद्यार्थाना निशुल्क शिकवणी व करियरमार्गदर्शन करते. सद्या लोबर्टी  निशुल्क क्लासेस धरमपेठशाखा, उत्तर नागपुरातील आवळे बाबू चौक येथील डॉ.बाबासाहेब 
आंबेडकर मिशन हॉल व पुण्यातील येरवडा येथील डॉ. आंबेडकर कॉलेज मध्ये सुरु आहे.  लवकरचदक्षिण नागपुरातील कुकडे ले आऊट येथे शाखा सुरु होणार आहे. 
   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  मागासवर्गीयांना  संघटित व्हा असा मूलमंत्र  दिला होता  तो मानसी बाळगूनपरिवर्तन  विखुरलेल्या  समाजाला एकत्र करूनसमाजात नवचैत्य  आणि आत्मविश्वाची निर्मिती करून  न्याय, स्वातंत्र्य  समता आणि बंधुता या आदर्श तत्वावर  शिक्षण व्यवस्थेची  पायाभरणी  करण्यासाठी नागपूर विद्यापीठाच्या इतिहासात    पहिल्यांदाच पदवीधर सिनेट  
'परिवर्तन पॅनल'   तयार करून " खूप  लढलो बेकीने आता लढूया एकीने" अश्या घोष वाक्यातून रातुम नागपूर विद्यापीठाच्या  पदवीधर सिनेट संघासाठी ४ फेबुवारी २०१८ रोजी  निवडणूकित 'परिवर्तन पॅनल'  रनसंग्रामातउतरला आणि  सर्वच उमेदवार उच्च शिक्षित असून१० जागा लढवीत दोन जागेवर विजय मिळवला.
            नागपूर विद्यापीठाचा सिनेट परिवर्तन पॅनल यशस्वी झाल्यानंतर चळवळराजकीय परिवर्तनाची सुरुवात झाली. आंबेडकरवादी राजकीय पक्षांच्यातरुणांनी चालवलेल्या 'खूप लढलो बेकीने आता लढुया एकीने' या अभियानाला समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळत असून काही आंबेडकरी पक्षांनीही तरुणांच्या या मागणीला पाठिंबा जाहीर केला.                                  " जो एक कि बात करेगा, युवा ऊस के साथ रहेगा" अश्या घोषणा देत तरुणांनी राजकीय ऐक्याचे आवाहन केले. तरुणांच्या मागणीला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्टपार्टी, बहुजन मुक्ती पार्टी व आंबेडकरराईट्स पार्टी ऑफ इंडियाने समर्थन दिले. या तरुणांनी 'एक विधानसभा , एक उमेदवार' या तत्वावर नागपुरशहरातील  सहा विधानसभा क्षेत्रात आंबेडकरी पक्षाचे सहा उमेदवार लढविण्यास आग्रह सर्वच रिपाई पक्षांकडे केली आहे. सध्या तीन पक्षांनीयांना समर्थन दिले आहे. राजकीय पक्ष काढणार नाही.ऐक्यासाठीचालणाऱ्या पक्षांना पाठींबा देवू. असा निर्धार करूनच हे अभियान  सुरु केले होते.  .
        समाजातील नागरिक, महिला, तरुणी, युवापिढी,  व्हाट्स अपवर शिवाजी-आंबेडकर मंच.महा, भिमाचे लेकर, आंबेडकरी मूव्हमेंट, युथ फॉररेव्हेलेशन , लिबर्टी, सत्यशोधक ग्रुप,  फेसबुकवर    आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती विचार, "खूप लढलो बेकीने आता लढुया एकीने", डॉ.बाबासाहेबआंबेडकर नॅशनल स्टुडेन्ट फेडरेशन नागपूर, दलित युथ पँथर, दलित पँथर ऑफ इंडिया, डॉ.बाबासाहेब वर्ल्ड फोरम ग्रुप ट्विटरवर #आंबेडकरयुट्युबवर सध्या स्टार प्रवाह  वाहिनीवरील मालिका डॉ.बाबासाहेबआंबेडकर-महामानवाची गौरव गाथाचा शिर्षक गीत सोशल मीडियावरतुफान                   गाजवत आहे. सोशल मीडियाचा वापर करून बाबासाहेबांची युथ  रिब्लिकन मूव्हमेंटला आज युवा पिढी  बळकट करण्याचे काम  करीत आहे.

     बट्राँड रसेल नावाच्या एका विद्वानाने ‘दि हार्म दॅट गुडमेन डू!’या शिर्षकाचा एक अद‍्भुत लेख लिहिला आहे.चांगली माणसं कोणतं नुकसान करतात? ती तटस्थराहतात. ‘आम्ही फक्त सामाजिक, धार्मिक कामचकरणार!, चळवळ करणं, राजकारण करणं हे आपलंकाम नाही’, असं म्हणून ती घरात बसतात आणि मगत्यांची जागा वाईट लोकं भरून काढतात. आज रिपब्लिकन चळवळ नको त्या  लोकांच्या हातात गेली, हे चांगल्या माणसांनी केलेलं नुकसान आहे. ती जर घराबाहेर पडून चळवळीत आली तर आणि तरच रिपब्लिकन चळवळ पुन्हा एकदा जोम धरू लागेल.
   मित्रानो सध्या परिस्थिती खाजगीकरणाची असल्यामुळे आपला तरुण भरकटत चालला आहे, त्याला चळवळीचा गंध नसल्यामुळे येणार्या आव्हानांना तोओळखू शकत नाही, जर का ह्या लोकसभा ,विधानसभ ,विधानपरिषद, राज्यसभेसाठी फुले शाहू आंबेडकर विचारांचे उमेदवार आपण पाठऊ शकलो नाही तर हि शेवटची पिढी कपाळावर हात मारल्या शिवाय तिच्याकडे काहीच उरणार नाही.    
  

लेखक : निलेश राऊत
मो. ९०७५०१८३६६
बेझनबाग नागपूर

1 comment: