Breaking News

आंबेडकरी विचारवंत ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे यांचे निधन





नागपूर,ता.२७ जेष्ठ  लेखक, समीक्षक आणि विचारवंत गंगाधर पानतावणे यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु होते. एमआयटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गंगाधर पानतावणे यांना यंदाचे साहित्यिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतें. राष्ट्रपती भवनात २० मार्चला या पुरस्काराचे वितरण झालें होते.  त्यानंतर अवघ्या सातच दिवसात गंगाधर पानतावणे यांची प्राणज्योत मालवली.
गंगाधर पानतावणे यांनी विविध विषयाची मुशाफिरी केली. दलित्य साहित्य आणि दलित चळवळ या विषयांत त्यांचे भरीव योगदान आहे.
महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांची विचारधारा साहित्याच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचें काम, पानतावणे यांनी केले.
गंगाधर विठोबाजी पानतावणे यांचा जन्म २८ जून १९३७ रोजी नागपुरातील पाचपावली बाससेनगर येथे झाला. त्यांचें प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपुरातच झालें. १९५६ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, त्यांनी बी ए आणि एमएची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तत्कालिन मराठवाडा विद्यापीठातून पीएचडीही प्राप्त केली. महत्त्वाचं म्हणजे त्याच विद्यापीठात म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले.
खरं तर पानतावणे यांनी मॅट्रिकनंतर लिखानाला सुरुवात केली होती. दलित साहित्य हा त्यांचा जवळचा विषय होता. यामध्ये त्यांचा भरपूर अभ्यास होता, त्यामुळेच त्यांनी विपुल लेखन केलें.
त्यांनी लिहिलेले `धम्मचर्चा` `मूल्यवेध` , मूकनायक, विदोहाचे पाणी पेटले आहे, वादळाचे वंशज, दलित वैचारिक वाड्गमय, किल्ले पन्हाळा ते किल्ले् विशाळगड, साहित्य, प्रकृती आणि प्रवृत्ती, साहित्य शोध आणि संवाद हे सर्व ग्रंथ वैचारिक आणि समीक्षात्मक असे आहे..
गंगाधर पानतावणे यांनी २००९ मध्ये अमेरिकेत झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.
-------------------------------------------
पानतावणे सर आपली उणीव नेहमीच भासेल
                                      डॉ. नितीन राऊत


नागपूर : अस्मितादर्श चळवळीतून लिहित्यांच्या तीन पिढ्या उभ्या करणा-या या अवलिया   आंबेडकर चळवळीतील सुप्रसिद्ध विचारवंत तथा विद्रोही साहित्यिक पद्मश्री डाॅ. गंगाधर पानतावणे सर आपली उणीव नेहमीच भासेल..आपण दिलेली शिकवण आमच्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. अशी शोकसंवेदना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली.

No comments