Breaking News

" शिवरायांचे राज्य रयतेचे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे " : डॉ. नितीन राऊत

           

                     
नागपूर, ता. ६ : राज सत्तेचा वापर समतेसाठी व जनतेच्या उत्थानासाठी करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी  शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले.  हिंदवी स्वराज्य हे ख-या अर्थाने जनसामाण्यांना व सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय देणारे होते असे महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालक मंत्री डॉ. नितीन राऊत नागपूर जिल्हा परिषद नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात  शासनाने आयोजित केलेल्या शिवराज्यभिषेक दिनानिमित्त गुढी पूजन सोहळ्यात  बोलत होते. 

  कार्यक्रमाला  प्रमुख पाहुणे  महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री व नागपूरचे पालक मंत्री डॉ. नितीन राऊत, नागपूरचे जिल्हाधिकारी मा. रविंद्र ठाकरे,  पोलीस  आयुक्त  सुनील फुलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  प्रमिला जाखलेकर  प्रामुख्याने उपस्थित होते.   

कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जिल्हा परिषद नागपूरच्या अध्यक्षा  रश्मी बर्वे आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात म्हणाल्या की, शस्र विद्येत व राज्य कारभारात निपून असलेले छत्रपती शिवाजी महाराज राज्यकरत्यांसाठी सदैव मार्गदर्शक ठरत आहेत व ठरणार आहेत. 

 शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेल्या वस्तूची मालकी हि शेतकऱ्यांची आहे राजाची किंवा सरदाराची नाही शस्त्र आहे म्हणून ते बळजबरीने घेता येणार नाही तसेच ती वस्तू हवी असेल तर  त्यांचे मूल्य अदा करूनच घेता येईल  हा क्रांतीकारी विचार  शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवरायांनी  पहिल्यांदा रुजवला असे डॉ. नितीन  राऊत भाषांत बोलत होते.   

सेंट रोबेन पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर काँलेज व न्यु चैतन्य स्कूल मिसाळ ले आऊट जरिपटका येथील संचालक जोतीराव बारसागडे यांच्या विद्यार्थ्यांनी  शिवाजी महाराजांची व मावळ्यांची वेशभूषा धारण करून शिव राज्यभिषेक सोहळ्याचा सुंदर देखावा निर्माण केला तर श्रीमती संध्या दळवी मँडम यांनी सुंदर गीते गाऊन कार्यक्रमात प्राण भरला. 

सुत्रसंचालन डॉ. मंजुषा सावरकर यांनी उत्तम रित्या सांभळला. कार्यक्रमाला शिक्षण  विस्तार अधिकारी रमेश हरडे, मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेचे मान्यवर पदाधिकारी , नेते व कर्मचारी उपस्थित  होते .  

सेंट रोबेन पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर काँलेज व न्यू चैतन्य स्कूल मिसाळ ले आऊट जरिपटका नागपूर चे  विद्यार्थी चैतन्य बारसागडे शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत तर प्रियाशु चव्हान, त्रुशांत बोरकर, दिगंबर मौर्या, नील बिरोले, त्रृप्ती देवकाते, म्रृनाल गजभिये, निशिका पात्रे, सिरीता चौधरी मावळ्यांच्या वेशभूषेत हजर होते.






No comments