"भारत स्वच्छता अभियानाला "श्री संत गाडगे बाबा नाव देऊन " भारत रत्न " पुरस्काराने सम्मानित करा
निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांनी देशाला स्वच्छतेचा मुलमंत्र देऊन शिक्षणाचे महत्व पटवुन देण्याकरीता समाज प्रबोधन करीत होते. गाडगे बाबा कधीच कोणत्या शाळेत गेले नाही कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेतले नाही तरी सुध्दा महाराष्ट्र सरकारने त्यांच्या या विचारांचा सम्मान म्हणुन अमरावती विद्यापीठला श्री संत गाडगे बाबा यांचे नाव देऊन गौरवनित केले.
![]() |
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन देतांना धोबी समाजाचे संजय भिलकर,मनिष वानखेडे,अरविंद क्षिरसागर,रमेश काळे, जगदिश थपीयाल, दुर्गादास जिचकारसह आदी मान्यवर |
यावेळी धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे यांच्या आदेशावरुण महाराष्ट्र राज्य धोबी सेवा मडळाचे प्रदेश महासचिव संजय भिलकर यांच्या नेतृत्वामध्ये विदर्भ अध्यक्ष मनिष वानखेडे, उपाध्यक्ष - रमेश काळे, नागपुर शहर अध्यक्ष- अरविंद क्षिरसागर, सामाजीक कार्यकर्ते जगदिश थपीयाल, दुर्गादास जिचकार उपस्थित होते.
श्री संत गाडगे बाबा गावो गावी जाऊन स्वताच्या हातात घराटा घेऊन पुर्ण गाव स्वच्छ करायचे व त्याच गावी रात्री कीर्तणाच्या माध्यमाधुन समाज प्रबोधन करुण स्वच्छता व शिक्षणाचे महत्व पटवुन देत असे लोकांच्या मानातील अंधश्रध्दा दुर करीत असे, गाडगे बाबांनी लोक वर्गणितुन दिन दुबळ्या , गोर गरीब लोकांच्या मुली मुलांन करीता शिक्षण मिळावे म्हणुन शाळा ऊघडल्या, दवाखाने ऊघडले, जनावरांन करीता गोशाळा उभ्या केल्या. या संस्थान मध्ये गाडगे बाबांनी आपल्या कोणत्याच नातेवाईक व मित्रपरिवाराला स्थान दिले नाही. हे विशेष
महाराष्ट्र सरकारने 2000 - 2001 मध्ये "श्री संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान " सुरु केले.
या अभियानाने स्वच्छतेची क्रांती घडून आली. लोक स्वता आपले गाव स्वच्छ करु लागले सरकारने सुद्धा स्वच्छ सुंदर दिसणाऱ्या गावाला पुरस्कार देऊन सम्मानित केले. म्हणुन भारत सरकारने श्री संत गाडगे बाबा यांच्या कार्यांचा त्यांच्या विचारांचा सम्मानार्थ " भारत रत्न " पुरस्काराने सम्मानित करुण भारत स्वच्छता अभियानाला सुध्दा " श्री संत गाडगे बाबा " यांचे नाव देऊन गौरवनित करावे अशी शिफारस भारत सरकारला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी करावी असे निवेदन देण्यात आले. या करीता भारत सरकारला लवकरात लवकर शिफारस करण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले.
या शिष्टमंडळामध्ये पापाजी शिवपेठ, दिपक सौदागर, मनोज कापसे, योगेश शिरपुरकर, राजु सेलुकर, रमेश मोकलकर, निलेश सौदागर, प्रकाश जुणघरे, विजय लोणारे, दिलीप टाकळकर, घनश्याम कनोजिया, वामनराव ठाकरे, प्रमोद क्षिरसागर ईत्यादी समाजबांधव उपस्थीत होते.
No comments