जाईचा सुगंध...माझ्या देशाचे अंगण : प्रभा चौधरी
भारतावर जरी इंग्रजाचे राज्य होते,तरी बहूजन समाजाच्या मनावर 'मनुवाद्यांची हुकूमत' होती. शूद्ध व स्त्रीयांना शिक्षण संस्कार घेणे 'महापाप' समजल्या जावी. या धार्मिक, सामाजिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शारिरीक मानसिक छळ सोसावा लागे. त्याच्यावर बहिष्कार टाकून त्याचे 'दाना-पाणी' बंद केल्या जाई.
![]() |
मातोश्री जाईबाई चौधरी |
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्री चळवळीची सेनानी मातोश्री जाईबाई चौधरी ज्या काळी स्त्री व शूद्रांनी शिक्षण घेणे महापाप' समजल्या जाई त्या काळात क्रांतिबा जोतिबा फूले, सावित्रीबाई फुलेचा आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने व प्रबोधनाने जाईबाई बापूजी चौधरी यांनी नवीवस्ती सदर येथे १९२२ साली जाईबाई चौधरी कन्या शाळेची स्थापना केली. त्यांच्या या शिक्षण संस्थेला १०० वर्ष पूर्ण झाले . त्यांच्या १३० व्या जयंती निमित्ताने, जाईच्या संघर्षमय जीवनाची यशोगाथा, जाईचा सुगंध....माझ्या देशाचे अंगण' हा लेख सुज्ञ वाचकांसाठी सादर करित आहे.
प्रभा चौधरी, जाईबाई चौधरींची नातसून त्यांना सर्व 'जाई मास्तरणी म्हणून ओळखत परंतू 'जाईबाई' म्हणूनच संबोधित मास्तरीन होईपर्यंत सर्व त्यांना 'जाई' म्हणत. जाईचा जन्म २ मे १८९२ साली एका अत्यंत गरीब मेश्राम कुटुंबात झाला. शिक्षणाअभावी अज्ञानाच्या काळोखात अत्यंत हाल अपेठेचे जीवन जगणाऱ्या कुटुंबात झाला. घरी चूल पेटावी म्हणून शेतात मजूरी, व जंगलातील वाळल्या कार्डया वेचून 'गोळी' बाजारात विकून, ओझे वाटून करणाऱ्या जाईच्या आई सोबत 'जाई' देखेल त्याच वाटेने जाऊ लागली. परंतू एके दिवशी जंगलात वाट विसरल्यावर आठ वर्षाच्या 'जाई'ला मिस ग्रेगरी ख्रिश्चन मिशनरी भेटली.
"येशू' च्या महाकरुणेने भारावलेल्या मिस ग्रेगरी ने जाईचे अश्रू आपल्या कोमल हाताने पूसले. तिला अपल्या बंगल्यावर नेले. खाऊ घातले व योग्य शिक्षणाने आपण आपले व इतरांचे जीवन कसे सुखी करू शकतो हे तिच्या बालमनाच्या भाषेत समजावून सांगितले जाईला तिच्या मिशनरी शाळेत नियमित येण्याचा प्रेमपूर्ण आग्रह केला.
त्याकाळी भारतावर जरी इंग्रजाचे राज्य होते, तरी बहूजन समाजाच्या मनावर 'मनुवाद्यांची हुकूमत' होती. शूद्ध व स्त्रीयांना शिक्षण संस्कार घेणे 'महापाप' समजल्या जावी. या धार्मिक, सामाजिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना शारिरीक मानसिक छळ सोसावा लागे.
त्याच्यावर बहिष्कार टाकून त्याचे 'दाना-पाणी' बंद केल्या जाई.
मनुवाद्यांच्या विरोधाला न जुमानता, 'जाई' मिस ग्रेगरी कडे शिक्षण घेऊ लागली. योग्य शिक्षणाने 'जाईची जीवन वेल फुलु लागली. बहरू लागली. आता जाईच्या आईची प्रकृती हळू हळू नाजूक होत गेली. ती बाहेरची कष्टाची कामे करू शकत नसे. संसाराचा गाडा ओढण्याची जबाबदारी 'जाई' वरच आली, जंगलात वाळल्या काडया वेचणे 'मोळी' बाधून बाजारात विकणे, ओझे वाहणे इत्यादी कामे जाई करू लागली व आईला न सांगता मिस ग्रेगरी कडे शाळेत जावू लागली, समाज कंटकानी जाईच्या आईला सामाजिक बहिष्कारांची धमकी दिली. लाचार आईने जाईस उपाशी ठेवणे, झाडाला बांधून गुळ चिंचेचे पाणी टाकून काठीने मारणे वगैरे साऱ्या शिक्षा करून पाहिल्या, पण जाई शिक्षण घेण्याच्या दृढनिश्वयापासून डळमळली नाही. आई हताश झाली व अखेर 16व्या वर्षी तीने जाईचे लग्न उमरेड येथील कलावंत तरुण बापूजी चौधरी हयांच्याशी केले.
'बापू' च्या कुटुंबाचा व्यवसाय शेती होता. बापूजी चौधरींची उमरेडची, शेती खदानीत गेल्यामुळे त्यांच्या उपजिविकेचे साधन गेले. शेताच्या मोबदल्यात मिळालेले पैसे घेवून ते नागपूरला जाईच्या वस्तीतच आले. जाई सोबत घर बाधूंन राहू लागले. ते जाई पेक्षा अठरा वर्षाने मोठे होते. त्यांच्या गुडघ्याच्या आजारामुळे मेहनतीचे कामे करू शकत नसत त्यात त्यांना दमा रोगाने पछाडले. मिस ग्रेगरीने उदर निर्वाहासाठी त्यांना एक 'टांगा' दान केला होता. ते चार पैसे कमवू लागले.
शिक्षण पूर्ण करून जाई आता 'जाई मास्तरणी झाली. गोर-गरीबांच्या वस्त्यात जाऊन ती मुलींना एकत्र करी, त्यांची वेणीफणी करी आपल्या सोबत त्यांना गाण्यास लावी. त्यांना मनोरंजक कथा सांगे, हळू-हळू वस्तीतील मुली जाईच्या मैत्रीणी झाल्या. जाई त्यांना लिहिणे-वाचणे शिकवी. जाईच रूप देखण होत. उंच ताठ बांधा, टपोरे सुन्दर डोळे, मधुर आवाज सुदंर ओढ, प्रेमळ स्वभाव व करूणेमुळे त्या गोरगरीब मुलीच्या सुख-दुःखात सहभाग, संभाषण कौशल्य व सहज कविता लिहिण्याचे कसब, नेतृत्वशैली सार त्या गावच्या मुलींनाच नव्हे तर त्यांच्या माय-बहनींना आकर्षित करू लागले. ओझे वाहून मजूरी करून मिळालेल्या पैशातील काही भाग ती त्यांच्याकरीता पाटी-लेखणी आणण्यात खर्च करी,
त्याच वेळेस गांधी काँग्रेसच्या नेतृत्वात भारतात स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली.
पिढ्या नः पिढ्या गुलामीत असलेल्या हा बहूजन समाज मोठया प्रमाणात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ लागला. जाई आपल्या स्त्रीयासह स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागली. भारताच्या क्षितीजावर दोन विचार प्रवाहाचा उदय झाला. एक महात्मा गांधी व कॉग्रेस दूसरा सुधारणावादी डॉ. बी. आर. आंबेडकर शाहू महाराज इत्यादी समाज सुधारक.
आता जाई मास्तरीण गोर-गरीबांच्या वस्त्या वस्त्यातून मुलींना शिक्षण संस्कार देण्यासोबत सभा सम्मेलनातून बाबासाहेबाचे विचार स्त्री-पुरुषां पर्यंत भाषणाद्वारे पोहोचवू लागली. शिक्षणाशिवाय बहुजन समाजाला तरणोपाय नाही. यावर तिचा दृढ विश्वास होता. क्रांतिबा ज्योतिबा फूले व सावित्रीचा आदर्श पूढे ठेवून डॉ. बाबासाहेबाच्या भाषणांनी प्रेरित होऊन १९२२ मध्ये एक अदबीने चाकलेल्या चन्द्रमोळी झोपडीत जाईने कन्या शाळेची स्थापना केली. या कन्या शाळेला जाईबाईची शाळा म्हणून संबोधिल्या जाई.
बाबासाहेब आंबेडकराची पत्रकारीता अत्यंत अभ्यासपूर्ण मुद्देसूद प्रभावी भाषणे, प्रकाशित साहित्य आणि त्यावरील चर्चा सार तत्कालीन आंबेडकरीन चळवळीच्या कार्यकर्त्यांचे 'उर्जास्त्रोत' झाले. जाई सभा सम्मेलनातून स्त्री प्रबोधन करू लागली जाई कन्या शाळेत अध्यापण कार्य करू लागली जाईला व बापूजी चौधरीना तीन अप्पत्ते झाली, नारायण श्रावण आणि भागन, श्रावण जाईचा मुख्य आधार होता. श्रावण सैन्यात अधिकारी झाला. दुसऱ्या महायुध्दात त्यांनी युध्दाचे भयानक ताडंव पाहिले. श्रावणचा विवाह पुलगावचे दमके ची सुस्वरूप, सुशिक्षित कन्या अनसूयाबाईशी झाले. पती श्रावण सैन्यात असल्या पासून अंतिम श्वासापर्यंत अनसूयाबाईनी जाईच्या संस्थेला नावारूपास आणण्यास अत्यंत कठोर परिश्रम केले.
श्रावण व अनसूयाला आठ
अपत्य झाली. उषा व मधू लहानपणीच वारले. इन्दूताई, अलका, सुधाकर, शोभा, सिता आणि नरेंद्र यांनी जाईचे स्वप्न साकार करण्यास माता अनुसया व पिता श्रावण हयांना सहकार्य दिले. अलका व सुधाकर हयानी जाईबाई कन्या शाळेची जबाबदारी आई अनसूया सोबत आपल्या शिरी घेतली. अलकाचे लग्न कामठीचे रमेश बनकर व सुधाकरचे लग्न पूलगावचे अप्पाजी वाणी हयाची सुविध सुस्वरूप कन्या प्रभा (माझ्याशी) झाला.
जाईची शाळा प्राथमिक पासून माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात रूपांतरीत झाली, जाई डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या सामाजिक शैक्षणिक चळवळीत 1922 पासून सक्रिय कार्यरत होत्या. अत्यंत हलाकिच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीत अनेक समस्याच्या वादळांना तोड देत, जाई, आपल्या ध्येयाकडे अखंड वाटचाल करित राहीली, आता जाई शिक्षणा बरोबर धम्म चळवळीत सक्रिय झाली. १४ ऑक्टोबर १९५६ ला तिने आपला नातू सुधाकर सोबत बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते दिक्षाभूमी नागपूर येथे त्रिसरण पंचशील व २२ प्रतिज्ञेसह बौद्ध धम्माची दीक्षा घेवून आपल्या पूर्वाश्रमीच्या (द्रविडीयन नागा बौध्द धर्मीय) जीवनात प्रवेश केला.
आता धम्म शिक्षण हा जे.सी.डी. मध्ये शिक्षणाचा मूळ आधार बनला. माझे पती सुधाकर चौधरी हयानी बौद्ध संस्कृती व बौध्दकालीन कला व ध्यानसाधना यावर ३० वर्षे अखंड संशोधन केले. ध्यानातून शिक्षण व सम्मादिठ्ठी या त्याच्या शैक्षणिक संशोधनाने जाईबाई चौधरी ज्ञानपीठाला " जे. सी.डी द स्कूल ऑफ मेरीटस " चा गौरव प्राप्त झाला. १९९३ पासून २०२१ पर्यंत जाईची संस्था अखंड एचएसएससी व एसएससी बोर्ड परिक्षेत गुणवत्ता यादीत आहे. दोन अडीच लाख विद्यार्थातून जाईबाई चौधरी ज्ञानपीठाच्या २००१ मध्ये पहिल्या १५ मेरीट मधून दहा मेरीट एचएसएससी बोर्ड परीक्षेत जाईबाई चौधरी ज्ञानपिठाच्या होत्या. एस. कृष्णापूरकर बोर्डात द्वितीय मेरीट होती, तर २००३ मध्ये एचएसएससी बोर्ड परिक्षेत प्रथम १५ पॅकी एकूण नऊ मुली गुणवत्ता यादीत होत्या. वैशाली गुमगांवकर ही प्रथम मेरीट होती.
एवढेच नव्हे तर शास्त्रीय बौध्दकालीन नृत्य, संगीत, चित्रकला सर्वात अद्भूत गुणवत्ता जे. सी. डी. ने प्राप्त केली. हॉकी (महिला) खेळात ३० मुली नॅशनल स्टेड लेव्हलला गेल्या, गाईडमध्ये राष्ट्रपति पूरस्कार, तर आर.एस.पी. मध्ये चिफ इन कमांड गौरवल जेसीडी.ला होता. दोन चित्रपट 'सुर्योदय से सूर्यास्त तक' डॉ. बाबा साहेबांच्या जीवन कार्यावर आणि 'हम राही एक राह हे शाळेने तयार केले. व त्याचा प्रिमिअर न्यायाधिश भाऊ वाहणे यांच्या हस्ते झाला. सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आयएएस., आयपीएस व इतर अधिकाऱ्यांनी वारंवार शाळेला येवून प्रबोधन केले. मान्यवरात बाबूराव बागुल, विठ्ठल वाघ यशवंत मनोहर, ज्योति लांजेवार, द.मी. कुलकर्णी, मा.घोडेस्वार सारखे 20 ते 30 साहित्यीक, परदेशातून आलेले मान्यवर व पूज्य भिक्षूगण, इ.झेड खोब्रागडे, पी. एस. खोब्रागडे, डॉ. भाऊ लोखंडे, प्रकाश खरात, अशोक सरस्वती असे मान्यवरांसारखे 20-25 प्रबोधनकार आणि वैद्यकिय क्षेत्रातील डॉ. मधूकर वासनिक, डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. रानडे, डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. • सुचित बागडे सारखे मान्यवर 15-20 डॉक्टर आणि मा. शंकरराव सुरडकर, मा. मुकेश कुल्लर, मा. रमेश उबाडे, मा.पी.जी.गवई यांनी शाळेत येवून प्रबोधन केले. मा.रा.सु. गवई व कमलाकरताई गवई हयांनी वेळोवेळी स्नेहाचे छत्र ठेवले. संस्थेला माजी मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक, मा.सुधाकरराव नाईक, मा. नरेंद्र तिडके, मा. नितीन राऊत सारख्या गुणींजनानी भेट देवून उपकृत केले. शाळेला शताब्दी वर्ष पूर्ण झाला असून नागपूर शहरातील सर्व पत्रकार माझे शिक्षकगण मुख्याधापक आंबुलकर, पूज्य भन्ते सुरई ससाई, पूज्य सदानंद भन्ते, भारतीय भिक्षू संघातील सर्व भिक्षूंचे धम्म प्रकल्पात सहकार्य लाभले. १९२२ ते २०२२ पर्यंत जाईच्या संस्थेने शताब्दी वर्षात पदार्पण करीत गोर गरिब विद्यार्थीनी विद्यार्थ्यांचे जीवन- भविष्य साकार करण्याचा प्रयत्न केला. त्यात सहकार्य देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आजच्या तरुण पिढीला स्त्री-मुक्ती चळवळीत कार्य करणाऱ्या त्या स्त्री कार्य कर्त्यांनी आणि 'मानवतेची स्पंदने जोपासणाऱ्यांना हा लेख प्रेरणादायी उरेल ही अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया मो. ९७६३१९०७७१ वर कळविल्यास माझ्या कार्यास अधिक उर्जा मिळेल.
लेखिका प्रभा सुधाकर चौधरी, प्राचार्या संचालिका ( एम.ए. मराठी, समाजशास्त्र )
जाईबाई चौधरी ज्ञानपीठ मंगळवारी बाजार, सदर नागपूर
No comments