Breaking News

जीवनशैलीत बदल गरजेचे


            २२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन विशेष

✍ निलेश राऊत
नागपूर,ता.२२ मानवाने केलेल्या पर्यावरणाच्या र्‍हासाकडे लक्ष वेधले जावे म्हणून अमेरिकेतील  गेलार्ड नेल्सन यांनी संकल्पना मांडली. २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिन साजरा करण्याची प्रथा १९७० मधे सुरू केली. आता हा दिवस ’जागतिक वसुंधरा दिन’ (World Earth Day) म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त्याने पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन होईल. याकरता  मानवाने  आपल्या दैनंदिन
जीवनशैलीत  बदल करणे गरजेचे आहे.

 जगभर विविध उपक्रम राबवले जातात.
रिसायकल आणि रियूज ही दोन महत्त्वाची तत्त्वे संवर्धनासाठी वापरली जातात.

१) झाडे लावा, झाडे जगवा
२) कंपोस्ट करणे, ओला कचरा व सुका कचरा या योग्य विभागणी करणे.
३) अनावश्यक वस्तू न घेणे, जे वेगवेगळ्या रूपात पुन्हा वापरता येतील ते वापरणे.
४) कागद, काचेच्या बाटल्या, प्लास्टीक या कच-यासाठी वेगळी हाताळणी करणे
५) वाहतूकीची सार्वजनिक साधने वापरणे
६) जिथे शक्य तिथे सायकल अथवा पायी चालणे
७) प्लास्टीक पिशव्यांचा कमीत कमी वापर

२२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ​ वरील पैकी ​किमान एक उपक्रम सुरू करा आणि राबवा.

No comments